पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारी आपली भाषा मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न …
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी वाड्मय मंडळामार्फत
दापोलीतील साहित्यप्रेमींच्या सोबतीने कुसुमाग्रज यांचा जन्मदिन उर्फ मराठी राजभाषा दिन उत्साहात
साजरा करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी
भूषविले असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुधेश मालवणकर व इतर मान्यवर कवीवर्य यांची उपस्थिती
होती.समारंभाच्या प्रथम टप्प्यातच सुधेश मालवणकर यांनी सुत्रसंचालकाची सुत्रे हाती घेत विद्यार्थ्यांशी
संवाद साधताना पाठीवरती हात ठेवून लढणारी आपली भाषा आहे, असे म्हणत मराठी भाषेची
ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या संवादातून विशद केली.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी स्नेहल घरवे, गायत्री जोशी, प्रियांका रामाणे, ऋतुजा झाटे, श्रेया
बोरघरे, रोहित जाखळ, स्नेहल घरवे, मानसी प्रसादे, समर मांजरेकर यांनी कणा आयुष्याला द्यावे
उत्तर पु. ल . एक साठवण माझी जन्मठेप, इत्यादी एकापेक्षा एक सरस कविता व उताऱ्यानचे वाचन
करून उत्तम सादरीकरण केले.
या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेचे महत्व सांगणाऱ्या लेखाचे अभिवाचन
केले जेणेकरून उपस्थित विद्यार्थ्यांना मराठी भाषेची उत्तम जाण व्हावी व त्याविषयी आपुलकीची भावना
त्यांच्या मनात रुजावी.
या समारंभामध्ये कवी संमेलन ही आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये दापोलीतील प्रतिष्ठित कवी
प्रशांत कांबळे, मंगेश मोरे, प्रा. कैलास गांधी, सुनील कदम, चेतन राणे यांना बोलविण्यात आले असुन
यासर्व कविवर्यानी आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा कवीते मार्फत श्रोत्यां समोर मांडल्याव समारंभाची लज्ज्त
वाढविली .
विविध गझलकार, कवी, नाटककार यांच्या साहित्याचे स्मरण व सादरीकरणही या संमेलनात झाले.
समारंभाच्या अंतिम टप्प्यात मराठी राज्यभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आलेल्या ' पुस्तक
परीक्षण स्पर्धेचे ' निकाल जाहीर करण्यात आले. यात एकूण ८ विद्यार्थ्यांचा समावेश असून प्रथम क्रमांक
जागृती मंडपे, द्वितीय क्रमांक भाग्यश्री जुवार , तृतीय क्रमांक प्रतीक्षा राऊत या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.
व इतर ५ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.
अव्वल क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे सुधेश मालवणकर व प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या
हस्ते बक्षिसे देण्यात आली. समारंभाच्या अंतिम प्रसंगी दिपाली दिवाण यांनी आभार प्रदर्शन केले व
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीत गायनाने विद्यार्थिनी तन्वी गुरव हिने समारंभाचा सुरेल
समारोप केला.
मराठी भाषेविषयी प्रेम व आत्मीयता जागृत करण्याचा सूहेतु मराठी राज्यभाषा दिनाच्या या समारंभामुळे
साध्य झाला असे आवर्जुन सांगता येईल.